शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा लिलाव पारदर्शक पणाने झाला पाहिजे – शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा लिलाव पारदर्शक पणाने झाला पाहिजे – शेतकऱ्यांची मागणी
सांगोला प्रतिनिधी – बाळासाहेब वाळके
सांगोला शहरातील,मार्केट यार्ड व मंडईत ,शेतीमाल, भाजीपाला विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांच्या, शेतीमालातून आडत ,कडता, कमिशन ,अडते व व्यापाऱ्यांनी अजिबात घेऊ नये , तसेच शेतीमाल मार्केट कमिटीच्या आवारात आल्या आल्या, तात्काळ इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करून वजन चिट्ठी आलेल्या व्यक्तीस देणे, व शेतीमालाचे लिलाव पारदर्शक पद्धतीने मोठ्याने बोलून, पुकारून लिलावात विक्री केलेल्या किमतीलाच पक्या पावतीवर लिहून, त्या त्या शेतकऱ्यांना त्यांची पक्की पावती व बिल तात्काळ दिली पाहिजेत. काही अडते व भाजीपाला लिलाव करणारे, पक्की बिल व तात्काळ पैसे शेतकऱ्यांना देत नाहीत
. अशा पडते,व्यापाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करून ,त्यांनी शेतीमाल अजिबात खरेदी करू नये, केल्यास पणन. कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशा प्रकारचे निवेदन संबंधित नगरपालिका मुख्याधिकारी, सांगोला उपनिबंधक , मार्केट कमिटी सचिव, यांना देण्यात आले आहे. संबंधित मुद्द्यांची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास, डी डी आर सोलापूर ,कलेक्टर सोलापूर व पणन संचालक पुणे यांच्याकडे आम्हाला दाद मागावी लागेल .तरीही न्याय न मिळाल्यास संबंधिता विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. याची दखल घ्यावी व शेतकरी बांधवांना न्याय द्यावा. त्यांचा आशीर्वाद संबंधित आणि घ्यावा.




